बुधवार, २३ मार्च, २०११

भारतीय मिडिया

भारतीय मिडिया (मिडिया म्हणजे मला इथे इलेक्ट्रोनिक मिडिया अभिप्रेत आहे)।किती परिपक्व आहे हा एक मोठ्ठा प्रश्न माझ्या डोक्यात गेले कित्येक दिवस घोळतोय. माझी खात्री आहे कि हाच प्रश्न आपल्याही मनात येत असेल. मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्थंभ असतो हे आपण सगळे ऐकतो आहोत. इथे दोन मुख्य प्रश्न उभे राहतात १. भारतातल्या लोकशाहीचे उरलेले तीन स्तंभ किती भक्कम आहेत? २. चौथा स्तंभ किती परिपक्व आहे?
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला फारशी अक्कल लागणार नाही। लोकशाहीतील गुंडांनी जे काही प्रताप केले आहेत ते आपल्या समोर रोज येत आहेत. ह्यात कोणत्याही एका पक्षाचा सहभाग नसून " मिळून सारे खाऊ भरभर" ह्या पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. पैसे कमविण्याचा सर्वात सोप्पा व्यवसाय म्हणजे राजकारण !
माझ्या सारखे आणि बहुतांश तुमच्यासारखे फक्त बंद खोलीत वादळी चर्चा करणार आणि 'त्यांना' शिव्या देणार। काहीजण तर हे सुद्धा न करता 'जाऊ दे न , आपण बोलून काय होणार?' असे म्हणून वीकेंड पार्टी मध्ये गुंग होणार. ह्या परिस्थितीचा फायदा मात्र ह्या कोल्ह्या आणि लांडग्यांचा होतो. त्याच्या अवैध कारवायांना उत येतो आणि त्यांच्या निर्लज्ज वर्तनाने आपल्याला त्या 'जाड' कातडीचे प्रदर्शन घडते.


आज ह्या लोकांची दादागिरी इतकी वाढली आहे कि आपल्यासारखी मणसे जीव मुठीत धरून राहत आहेत.
हे सगळा आजूबाजूला होत असताना 'आम आदमी' मिडिया कडे एका अपेक्षेने पाहतो आहे। लोकशाहीच्या ह्या महत्वाच्या स्तंभा ची भूमिका खूप निर्णायक आहे। स्वातंत्र्यापूर्वी जनजागृतीचे जे काम वृत्तपत्रांनी केले तेच काम आज इलेक्ट्रोनिक मिडिया ने करावे अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र अगदीच उलटे दिसते. आज टीवी वरील बहुतेक चंनेल्स हि राजकीय पक्षांच्या हातातली बाहुले झाली आहेत. कित्येकवेळा असेही दिसून येते कि एखादी 'ब्रेंकिंग न्युज' एखादे चांनेल सतत दाखवीत राहते. कोणत्यातरी पक्षावर ती न्युज चांगलीच शेकणार असते. माझ्या सारख्या माणसाच्या अपेक्षा पण वाढतात. असे वाटते कि खरच आता मोठ्या धेंडांचा पर्दाफार्श होणार, पण तेवढ्यात काहीतरी 'चमत्कार' होतो आणि ती न्युज त्या चानेल वरून गायबच होते! ह्या मागील रहस्य हे उघड आहे आणि हीच मिडिया ची एक मोठ्ठी शोकांतिका सुद्धा.
निर्भीड पत्रकारिता ही आता इतिहास जमा होते आहे.
मिडिया वरील बातमीदार - हे सुद्धा एक मनोरंजनाचे साधन आहे. ज्यांनी सार्वजनिक जीवन २/ ४ वर्षापेक्षा जास्त दिवस अनुभवले नाही अशी मंडळी आपल्यायला राजीकीय भाकिते आणि Expert comments देताना दिसतात. २४ तास काहीतरी दाखवावेच लागणार म्हणून कुठल्यातरी बातम्या प्रेक्षकाच्या माथी मारण्याचे काम सुरु ठेवायचे। बातम्या ५ मिनिटे आणि जाहिराती ८ ते १० मिनिटे असे ह्याचे स्वरूप आहे. हे बदलायला हवे. बातमी हि तिच्या मूळ रूपात पोचविणे हे मुख्य काम मिडिया विसरली आहे असे दिसते. म्हणूनच मला वाटते कि हा चौथा स्तंम्भ जो पर्यंत व्यावसायिक स्पर्धेतून बाहेर येणार नाही तो पर्यंत त्याचा अपेक्षित परिणाम हि होताना दिसणार नाही. काही थोडे अपवाद वगळता मिडिया हा एक व्यवसाय झाला आहे. समाजाचा हा 'आरसा' तितकासा पारदर्शक दिसत नाहीये।

अभय

२ टिप्पण्या:

Nandu म्हणाले...

cool keep it up

How u write Marathi?

Nandu
Canada

वियुष साकरकार म्हणाले...

आवडल !! सुंदर लिहिलेल आहे. योग्य रित्या बऱ्याच गोष्टी आल्या आहेत.